Sunday, January 27, 2019

Kali Jogin Book Review by Pustakexpress





काळीजोगीण
लेखक - नारायण धारप


काही लोक अशी असतात ज्यांना सर्व गोष्टी झटपट लवकर हव्या असतात.समाजामध्ये अशा लोकांची संख्या जास्त आहे.ज्यांना कष्ट करणे हे नको वाटते.झटपट यश, झटपट श्रीमंती मिळवण्यासाठी काहीही उपाय करण्याची त्यांची तयारी असते. मग ते अघोरी उपाय असले तरी, त्यासाठी कोणतीही किंमत चुकवावी लागली तरी.सर्व काही झटपट मिळवण्याच्या हाव्यास पोटी आपल्या  सोबत आपल्या लोकांचीही वाताहत होत आहे हे त्यांना समजत नसत.
नमस्कार मित्रहो आज मी तुम्हाला अशाच एका पुस्तक विषयी सांगणार आहे. रहस्यमय आणि गूढतेने खच्चून भरलेलं पुस्तक. आता रहस्यमय आणि गूढ लेखन म्हंटल कि त्यांच नाव अव्वल स्थानी येते. वाचकांना आपल्या लेखणी द्वारे शेवट पर्यंत खेळवत ठेवणारे  लेखक म्हणजे आदरणीय नारायण धारप(सर).त्यांच्या रहस्यमय आणि गूढ कादंबरी मधील एक कादंबरी मी आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे. ती म्हणजे काळीजोगीण.
कादंबरी बघायला गेलं तर छोटी वाटते. फक्त ९१ पानांची. पण जेव्हा आपण ती वाचायला सुरवात करतो तेव्हा आपण त्या मध्ये हरवुन  जातो. कादंबरी हातातुन बाजूला ठेवता येत नाही.कादंबरीची सुरवातच वाचला आपल्या जवळ ओढुन घेणारी आहे. आपल्या श्रीमंत बहिणीच्या आणि तिच्या यशस्वी पतीची बरोबरी करण्यासाठी. त्यांच्या पुढे जाण्यासाठी काहीही करण्याची तयारी अच्युतची असते. त्यासाठी तो खुप प्रयत्न करत असतो. त्याच दरम्यान त्याच्या ऑफिसमधील एक मित्र काळ्याजोगिणीची कथा सांगतो. काळी जोगीण आपल्याला हवं ते देती. मग ती श्रीमंती असो वा आणि काहीही. अच्युत हिच गोष्ट मनात धरतो आणि या काळ्याजोगिणीच्या शोधात बाहेर पडतो. काळ्याजोगिणीच्या भेटीमध्ये अशी काही घटना घडते ज्यांनी अच्युत एका अनामिक विश्वामध्ये,एक अनामिक न सुटणाऱ्या भूलभुलैया मध्ये अडकुन पडतो. त्याच्या मधून बाहेर पढणे जवळ जवळ अशक्यच. नलिनी अच्युतची पत्नी त्याला या मधुन बाहेर काढण्यासाठी त्या अनामिक शक्तीशी दोन हात करते. यामध्ये तिला लोकांची  साथ सुद्धा मिळते. पण या लढ्यामध्ये नलिनी अश्या काही प्रकारे अडकते त्याने वाचणाऱ्याचे मन सुन्न होऊन जाते. आणि वाचणाऱ्याला सुद्धा वाटतं आता सगळं संपलं. पण तो शेवट नसतो खरी गोष्ट अजुन नक्की बाक्की असते.......
 लेखकानी कादंबरी मध्ये काही गोष्टी उदाहरणासह मांडल्या आहेत. (उदा. आरशावर आलेल्या तेलकट तवंगाचे,समुद्राच्या लाटाचे.) चित्तथरारक,रोमहर्षक,अकल्पित,गूढतेची एखाद्या भयपटाला शोभावी अशी हि गोष्ट. लेखक नारायण धारप यांनी इतक्या उत्तम प्रकारे मांडली आहे की कादंबरी वाचकाला तिच्याकडे ओढून धरते. हीच तर लेखन नारायण धारप यांच्या लेखनाची  खासियत आहे जी वाचकाला अक्षरशः वेड लावते.भय,गुढ,रोमहर्षक अशा विषयांच्या वाचनाची आवड ठेवणाऱ्यांसाठी प्रत्येक वाचकाच्या संग्रही हे पुस्तक असायला हवेच. प्रत्येक वाचकाने जरूर वाचावी अशी हि कादंबरी लेखन नारायण धारप लिखित काळीजोगीण.
 मित्राण या कादंबरी निमित्य आज एक गोष्ट तुमच्या समोर मांडावीशी वाटते. झटपट यश झटपट श्रीमंती मिळवण्यासाठी अजुनही काही लोक अघोरी उपाय करत आहेत. खोट्या अंधश्रद्धेमुळे किती तरी कुटूंब बरबाद झालीत. कितींची वाताहत झाली. आणि किती तरी लोकांनी अंधश्रद्धा हा समाजाला लागलेला आजार मिटवण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले. त्या व्यक्तींमध्ये मी एका व्यक्तीच नाव पुर्ण अभिमानाने घेत आहे. ती व्यक्ती म्हणजे आदरणीय डॉ. नरेंद्र दाभोलकर (सर). खोट्या अंध श्रद्धाचा  समाजाला लागलेला आजार मिटवण्यासाठी डॉक्टरांनी आपले आयुष्य खर्ची केले. त्यांनी चालवलेला हा लढा अजुनही अविरत पणे  सुरू आहे. त्या लढ्याला मदत करणारीही  कादंबरी आहे. जी आपल्याला  खोट्या अघोरी अंध श्रद्धेच खरं रुप दाखवते. त्या पासुन सावध रहाण्याचा इशारा देते.



- श्रीजीवन तोंदले

Sunday, January 20, 2019

Gujarat Files Reviews Book by Rana Ayyub




गुजरात फाईल्स-कृष्णकृत्याचा रहस्यभेद
राणा अय्युब



ह्या जगात अशी काही माणसं आहेत जी सत्याच्या शोधात स्वतःला पुर्णपणे झोकुन देतात. आपले इच्छित साध्य होत नाही तोवर ते धडपडत असतात. मागे न फिरता, मग त्यांच्या वाटेमध्ये कितीही अडथळे आले तरीही प्रत्येक परिस्थितीला तोंड देत पुढे जात रहातात. कारण त्यांना माहिती असते मागे फिरणे सोपे असते पण पुढे जाणे तितकेच गरजेचे आहे. मग ती व्यक्ती जर एक पत्रकार असेल तर...?खऱ्या आणि सत्य गोष्टी लोकांसमोर आणणे हे त्याचे परम कर्तव्य असते. उगाचच पत्रकारितेला या लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते नाही. ५ जानेवारीला पत्रकारदिन झाला.बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, खाडिलकर, महाजनी, आचार्य अत्रे यांच्यापासून सुरू झालेली पत्रकारितेची ही आता अर्नब गोस्वामी,राजदीप सरदेसाई,प्रसन्न जोशी,बरखा दत्ता,गौरी लंकेस,अंजना ओम कश्यप,आणि ह्या मध्ये एक नाव आवर्जुन घ्यावे ते म्हणजे राणा अय्युब. या आणि अश्या खुप पत्रकारांनी ही परंपरा अविरतपणे पुढे घेऊन  जात आहेत. 
पत्रकार हा निर्भीड असतो. कोणाच्या दबावाखाली न येता सत्याची कास धरून प्रत्येक घटनेमागचे सत्य लोकांसमोर आणतो.अशेच काहीसे काम पत्रकार राणा अय्युब यांनी केले आहे. राणा अय्युब ह्या एक धाडसी पत्रकार आहेतच शिवाय घटनेच्या मुळापर्यंत जाऊन त्याच्या मागचे खरे सत्य पुढे आणणे हे काम त्यांनी खुप धाडसाने केले आहे आणि करत आहेत. राणा अय्युब ह्या स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार,लेखिका आणि तेहलकाच्या माझी संपादिका आहेत.
मी याठिकाणी पत्रकार राणा अय्युब यांनी स्वतः लिहिलेल्या त्यांच्या पहिल्या पुस्तक संबंधी मी बोलत आहे. आणि ते पुस्तक म्हणजे गुजरात फाईल्स-कृष्णकृत्याचा रहस्यभेद. हे पुस्तक शोध पत्रकारितेचा एक आदर्श नमुना म्हणावे लागेल. या पुस्तकामधुन एक गोष्ट समजून येती. ती म्हणजे हातात सत्ता असणाऱ्या लोकांनी त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडुन आपलं इच्छित साध्य करून घेतले.कधी दबावतंत्र वापरले तर कधी सत्तेचा वापर केला. २००२ ते २००६ च्या दरम्यानच्या गुजरात मधील दंगली आणि त्या दरम्यानच्या खोट्या चकमकीच्या मागचे सत्य राणा अय्युब यांनी या पुस्तकामधुन मांडला आहे. ११ प्रकारणांमधुन हा सर्व रहस्य भेद या पुस्तकामधुन सुमारे २०० पानांमध्ये मांडला आहे. गुजरात मध्ये ज्या खोट्या चकमकी झाल्या. त्यांचा पडदाफाश करण्यासाठी राणा अय्युब यांनी मैथिली त्यागी या नावाने गुजरातमध्ये वास्तव्य केले होते. हे काम पुर्णत्वा कडे घेऊन जाताना राणा अय्युब यांना खुप संकटांना सामोरे जावे लागले. कधी अंधाऱ्या बंगल्यामध्ये रहावे लागले. जेथे एका सापाचे वास्तव्य होते. तर कधी एका महिला पोलिस माधिकाऱ्याला भेटण्यासाठी दुर निर्जन ठिकाणी एकटीला जावे लागले. ह्या सर्व रोमहर्षक प्रवासामध्ये राणा अय्युब यांना काही चांगल्या व्यक्ती हि भेटल्या. ज्यांनी त्यांना वेळोवेळी मदत केली.सर्व गोष्टींचा सत्य शोध घेतल्या नंतर राणा अय्युब यांच्या पदरी उपेक्षाच आली. त्यांनी बनवलेला रिपोर्ट पब्लिश होणार नाही असे त्यांना सांगण्यात आले. कारण ज्या व्यक्तीच्या विरोधात त्यांनी पुरावे गोळा केले. ती व्यक्ती उद्याच्या भारत देशाची भावी पंतप्रधान होती.(आहे)
 राणा अय्युब यांनी जे सत्य आपल्या समोर मांडले हे कितीपत खरे आहे हे माहिती नाही. कारण हि नाण्याची दुसरी बाजु आहे. नाण्याची एक बाजु आपण या आधीच वर्तमानपत्रातुन वाचली आहे. जसजसे आपण हे पुस्तक वाचुन पुर्णत्वाकडे जातो. तसे खरे सत्य काय हे आपल्या समोर येते. राणा अय्युब यांना त्यांनी बनवलेला रिपोर्ट पब्लिश होणार नाही हे सांगितले गेले. तेव्हा त्यांनी हे पुस्तक पब्लिश करण्याचे ठरवले. आणि त्यामध्ये त्यांना खुप लोकांनी मदत केली.
ज्या लोकांना सत्य जाणुन घ्यायची आवड असते. त्यासाठी बंड हि करावा लागला तरी त्याची तयारी असते अशा लोकांसाठी हे पुस्तक आहे. हे पुस्तक जेव्हा आपण वाचाल तेव्हा काही व्यक्तीची खरी ओळख आपल्याला नव्याने होईल. प्रत्येकाने आपल्या संग्रही हे बंडखोर पुस्तक जरूर ठेवावे. प्रत्येकानी जरूर वाचावे असे हे पुस्तक पत्रकार राणा अय्युब लिखित गुजरात फाईल्स-कृष्णकृत्याचा रहस्यभेद.

-        

           श्रीजीवन तोंदले

Sunday, January 13, 2019

तणकट



तणकट
-        राजन गवस
नमस्कार मित्रहो आज रविवार परत एक नवीन पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. एक अशा लेखकाचे पुस्तक ज्याच्या प्रत्येक पुस्तकास विविध पुरस्कार मिळालेले आहेत,कोल्हापुर शिवाजी विद्यापीठातुन एम.ए.,एम एड पर्यंत शिक्षण पूर्ण केले.भोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करून ते प्रभावीरीत्या लोकांसमोर मांडणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य मानले जाते.त्यांच्या अशाच प्रभावी लेखणीतुन अवतरलेली साहित्य अकादमीपुरस्कार प्राप्त कादंबरी म्हणजे राजन गवस लिखित तणकट.
कादंबरी वाचायला सुरवात केली आणि ती हातातुन बाजूला ठेवावीच वाटत नाही.एखाद पुस्तक वाचायला सुरवात केल आणि कधी एकदा ते पुर्ण करतो असच होत. कारण कथेच्या शेवटी काय आहे याची उत्सुकता रहाते. कथा जेव्हा शेवटाकडे येते तेव्हा ती कधी संपुच नये अस वाटते. तणकट या कादंबरीविषयी माझी भावना अशीच आहे.कादंबरी वाचायला सुरवात केली आणि ती बाजूला ठेऊ वाटत नाही.कादंबरीचे प्रकाशन साकेत प्रकाशनने केले आहे. कादंबरीचे मुखपृष्ठ विकास जोशी यांनी साकारले आहे.
आता कादंबरी विषयी सांगतो, लेखक राजन गवस यांची समाजामधील प्रत्येक घटकांवर आणि प्रत्येक घटनांवर एक वेगळीच नजर असते. त्याच प्रभावी नजरेतुन ते प्रत्येक गोष्ट,घटना,विषय आपल्या कथेतून मांडतात. तणकट ही कादंबरी सुद्दा लेखकाने तितक्याच प्रभावीपणे आपल्या समोर मांडली आहे.
तणकट या कादंबरीमधुन गावा-गावा मधील जाती-पातीच राजकारण अगदी गावाकडच्या भाषेमध्ये मांडले आहे. कादंबरीचे कथानक साधारण नव्वदच्या दशकातील आहे. एक अस दशक ज्यावेळी समाजातील एका वंचित घटकाच्या हिताचे नवनवीन कायदे तयार झाले. हे कायदे काय आहेत कोणासाठी आणि कशासाठी आहेत हे त्या वंचित घटकाला माहित नव्हते.याच गोष्टीचा फायदा काही लोकांनी आणि खुद्द काही त्याच वंचित घटकातील लोकांनी घेतला. याच कायद्यांचा वापर करून जाती जाती मध्ये तिढे निर्माण केले. कथेचा खलनायक शेंडबाळे त्याच वंचित घटकातील लोकांना हाताशी धरून गाव मध्ये आपलं राजकारण खेळात रहातो. कथेचा नायक कबीर हा त्याच घटकातील एक. आपल्या अवती-भोवती जे राजकारण सुरु आहे ते चुकीचं आहे. हे माहिती असुन सुद्धा त्याला काहीच करता येत नसते. मग शेवटी अशी काही घटना घडते त्या घटनेने सर्व गाव हदरून जाते. त्या सोबत वाचणारा वाचक सुद्धा हदरून जातो. कादंबरीमध्ये काही अशा घटनांचे वर्णन केले आहे ते वाचले की आज आपल्या जु-बाजुला जे जातीपातीचे राजकारण सुरु आहे. त्याची विदारकता समजते.
सध्या समाजामध्ये अजुन हि जातीपातीचे राजकारण सुरु आहे. कुठे छुप्या पद्धतीने तर कुठे उघड पणे. मिळालेल्या सुविधांचा कोण योग्य वापर करत आहे. तर कोणी त्याच सुविधांचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून समाजामध्ये तिढे निर्माण करत आहेत.सामाज्यामध्ये चाललेल्या या घटना पाहिले की मन सुन्न होऊन जाते.

मला असे वाटते की देवाने फक्त माणुस घडवला आणि माणसाने हे जातीपातीचे बंधने घडवली.याच जातीपातीच्या थोतांडाने माणसांच्या मध्ये द्वेष निर्माण झाले. जेव्हा ह्या जातीपातीच्या भिंती कायमच्या नष्ट होतील तेव्हाच माणुस माणसाला माणसा सारखी वागणुक देईल. याच जातीच्या भिती कायमच्या दुर करण्याचा आणि माणुसकी हाच खरा धर्म,जात,पंत आहे. हे विचार लेखक राजन गवस यांनी या कादंबरीमधुन मांडले आहेत. प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक जरूर असलेच पाहिजेल.


श्रीजीवन तोंदले.