Sunday, March 31, 2019

काळेकरडे स्ट्रोक्स.






काळेकरडे स्ट्रोक्स

           

                                                          लेखक - प्रणव सखदेव

 

आज काल कोणाचेच आयुष्य साधे सरळ नसते. कधी चढ-उतार, कधी सुख-दुःख,कधी यश-अपयश,कधी आनंद,कधी रोमांच आणि कधी कधी तर संपुर्ण गोंधळ. हा गोंधळ इतका की एखादा हे असे आयुष्य बघुन स्वतःच गोंधळात पडावा आणि आपसुक म्हणावा की  कोणाचे आयुष्य इतकं गोंधळ पुर्ण असु शकते..? हा गोंधळ पण कसा तर एका मध्ये एक गुणतत जाणारा...? पण किती ही गोंधळ,दुःख,संकटे असली तरी माणुस त्यावर मात करून आपले आयुष्य परत सुरळीत करण्याचा प्रयत्न करतोच आणि सुरळीत बनवतो.

आज असेच एक पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलो आहे. सध्या वाचकांच्या मनाला या कादंबरीने अक्षरशः वेढ लावले आहे. ती म्हणजे लेखक, कवी प्रणव सखदेव लिखित 'काळेकरडे स्ट्रोक्स'. प्रणव सुखदेव यांची ही पहिलीच कादंबरी आहे. पण जेव्हा आपण ही वाचायला सुरवात करतो तेव्हा ती आपल्याला तिच्याकडे घट्ट ओढुन घेते. आणि यामुळे लेखकाची ही पहिली कादंबरी आहे यावर विश्वास बसत नाही. अत्यंत विचारपुर्वक, प्रत्येक घटनांचा, प्रसंगाचा वापर अत्यंत योग्य प्रकारे केला आहे. एखाद्या हिंदी चित्रपटापेक्षा सरस कथानक आहे. कथा जरी २०१० ते २०१२ दरम्यानची असली तरी कादंबरीमध्ये आजच्या तरुण पिढीची भाषा आहे. ज्याकाळामध्ये  wtsapp, face book ही माध्यम नव्हती. कॅल्लिंग रेट जास्त होते त्यामुळे लोक SMS वर अवलंबुन होते. विशेषतः महाविद्यालयीन तरुण-तरुणी . कादंबरीमध्ये तरुणाईचे आजच्या बोली भाषेतील शब्द आहेत.उदा. चुतीयाटिक,चुतिया,चुतड,फक हे आणि बरेच काही.    

कथेचा नायक समीर हा १९ ते २१ वयो गटातील युवक आहे. त्याच्या आयुष्यामध्ये घडणारे प्रसंग आणि त्यामुळे उध्दभवणारी परिस्थिती यामुळे वाचक विचारत पडेल की एखाद्याचे आयुष्य इतक्या गोंधळणी भरलेल असु शकते..? प्रत्येक महाविद्यालयी तरुण या वयात काहीतरी वेगळच करण्याच्या नादात असतो कारण ते वय ही तसेच असते. या वयामध्ये काही चांगल्या सवयी लागतात तर काही वाईट वेसने ही जडतात. अतरंगी सवयी,वेसने यावयात मुलांना लागतातच.

कादंबरीची सुरवात फ्लॅशबॅकने होते. प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घेऊन चांगली नोकरी करून अमेरिकेला जावे. चांगले शिक्षण म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनीर असे. पण मुळातच बंडखोर स्वभावाचा समीर त्याला काही तरी आऊट ऑफ बॉक्स जाऊन करायचं आहे.  आपल्या घरच्यांचा विरोध पत्करून मुंबईतील रुईया कॉलेजमध्ये आर्टस् घेऊन मॅस्कॉमला प्रवेश घेतो. कारण त्याला फिलीम मेकिंग मध्ये करियर करायचं आहे.  कॉलेज मधील ब्लाईंड सेल मधील विध्यार्थ्यांसाठी काम करते वेळी त्याची भेट चैतन्य या अंध विद्यार्थ्यांशी आणि त्याची प्रियासी सोनाली यांच्याशी त्याची मैत्री होते. चैतन्य हा डोळ्यांनी जरी अंध असला तरी आयुष्याकडे डोळस पणे पाहण्याची दृष्टी त्याच्या कडे आहे. पुढे चैतन्यच्या अपघाती मृत्युमुळे सानिका आणि समीर यांच्या आयुष्यामध्ये एक अनामिक वादळ येते. इथेच कादंबरीचा पहिला chapter समाप्त होतो.

 चैतन्याच्या मृत्युनंतर समीर आणि सोनाली यादोघांचे आयुष्य भरकटून जाते. एका घटनेमुळे सोनाली ही समीर पासुन दुरावते ती कायमची. पुढे समीरच्या आयुष्यामध्ये खुप लोक येतात.अरुण,सलोनी,दादुकाका. अरुण म्हणजे सगळ्या वेसनांमधील बापा माणुस. अरुणही समीर सारखाच बंडखोर घरच्या पासुन दुर रहाणार. अरुणची आयुष्याकडे बघण्याची याख्या थोडी वेगळी आहे. त्यासोबत दादूकाका हा वयस्कर आहे आणि त्याने आयुष्यामध्ये खुप पावसाळे पाहिले आहेत. अरुण आणि दादूकाका यांचा या कादंबरीमध्ये एक तत्वज्ञानी वाटा आहे. सलोनी ही समीरच्या आयुष्यामध्ये काही वेगळाच वळण घेऊन येते. तिच्या सोबत तो एक साधे सरळ आयुष्य जगत असतोच पण  एक वेगळंच वादळ येते आणि त्यामध्ये दोघांचे आयुष्य उध्वस्थ होऊन जाते.

 असे म्हणतात मनुष्याचे आयुष्य, त्याचा जीवन प्रवास जिथुन सुरु होते तो तिथेच येऊन थांबतो आणि समाप्तही होतो. तसेच कादंबरीची कथा रुईया कॉलेजच्या कट्ट्या पासुन सुरु होते आणि तिथेच येऊन थांबते. पुर्ण होते. कादंबरीचे प्रकाशन रोहन प्रकाशन यांनी केले आहे. कादंबरीची भाषा आणि अक्षर जुळवणी अत्यंत सुटसुटीत आहे. त्यामुळे वाचनामध्ये गोडी निर्माण होते. कादंबरीचे मुखपृष्ठ अन्वर हुसे यांनी अत्यंत शोधक पद्धतीने केले आहे. कथे मधील प्रत्येक व्यक्ती या मुखपृष्ठावर आहेत. मुळशी खोऱ्यातील औदुंबर सुद्धा. हे मुखपृष्ठ वाचकांना कादंबरीकडे आकर्षीत करते. प्रत्येक वाचकाच्या संग्रही ही कादंबरी असावी आणि  प्रत्येक वाचकाने जरूर वाचली पाहिजेल अशी  कादंबरी  प्रणव सखदेव लिखित काळेकरडे स्ट्रोक्स.

 

 जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर click करा -

https://rohanprakashan.com/product/kalekarde-strokes/

रोहन प्रकाशन यांच्या इतर दर्जेदार पुस्तकांसाठी आणि माहितीसाठी  click करा.

Sunday, March 17, 2019

शितू



शितू

लेखक - गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकर

एका लेखकासाठी आपले लिखाण. आणि त्या लिखाणातुन साकार झालेली कलाकृती ही त्यांच्या मनाच्या अगदी जवळ असते. एखादा लेखक आपल्या विचाराने, समाजामध्ये उध्दभवणाऱ्या परिस्थितीमधून विचार करून एखादी कथा,कादंबरी लिहितो म्हणजे त्याच्या साठी एका आपत्याला जन्म देण्यासाखेच असते. आणि त्या कथेतील एखादी व्यक्तिरेखा त्या लेखकाच्या जवळची असेल तर...? जणु त्या व्यक्तिरेखेवर त्यांनी पोटच्या मुली सारखं प्रेम केले असेल तर..?
नमस्कार मित्रहो आज एक अशी कादंबरी घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. जी लेखकाच्या अत्यंत जवळची आहे.जणू त्यांची पोटची पोरच. त्यांनी जेव्हा ही कादंबरी वाचकांच्या हाती सोपवली तेव्हा असं वाटत होतं कि जणु ते आपल्या पोटच्या पोरीची पाठवणीच करत आहेत.कोकण कन्येची कथा सांगणारी कादंबरी म्हणजे गो.नी.दाण्डेकर (गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकर) लिखित शितू.
अत्यंत मृदू आणि खुपच प्रेमळ कथा जी वाचते वेळी वाचकाचे मन सुद्धा प्रेमळ होऊन जाते. कथेची पार्श्वभुमी कोकणातील आहे. कोकणातल्या खाडीपट्च्या निसर्गाचे वर्णन लेखकानी खुपच छान पद्धतीने केले आहे. ते वाचते वेळी वाचकाच्या नजरेसमोर खाडीपाटचा कोकण उभा रहातो. कैऱ्यांची कलमे,काजूच्या बोंडांची धुंद गंध,मुळापासून वाढलेले फणस,कोकमांची नीटस,जांभळं,करवंदी,नारळी,फोपळी,सुपारी,शहाळी,बावीमध्ये साठणारं पाणी अहा...हा..हा  नजरे समोर कोकणच उभारहातो.
अशा या हिरव्यागार कोकणामध्ये बहरते एक सुंदर प्रेम कथा.वेळेश्वर गावचे खोत म्हणजेच अप्पा खोत. अप्पा हे गावचे खोत जणु ते संपुर्ण वेळशीचे भुपतीच. सारा गाव त्यांच्या कडे बापाच्या नजरेने बघायचा. कोणच्या घरी काय कमी पडले तरी स्वतःच्या घरच देणारे. चिंगल्याचं घर जाळले तेव्हा त्या आगीत उडी घेऊन चिंगल्याच्या म्हातारीला वाचवतात आणि घर उभं करायला मदतही करत. अप्पा जन्मताच हे सर्व दातृत्वाचे कवच अंगावर घेऊन आले. असे हे आप्पा. अप्पांची पत्नी लहान मुलाच्या बाळंतपणातच गेल्या.
आप्पांचा लहान मुलगा विसू महा खोडकर, संपुर्ण गाव त्याच्या खोड्यानी हैराण झाले पण आप्पा खोतांच पोर म्हणुन गाव त्याच्या कडे दुर्लक्ष करी. पण विसू सुद्धा अप्पांसारखाच प्रेमळ आणि जवाबदारी घेणारा. आप्पानी संपुर्ण गावाचे पालकत्व घेतले.त्यामध्ये त्यांनी एका बालविधवा मुलीला, जिचा जन्मदाताच तिचा जीवघेत होता त्याच्या तावडीतुन सोडवुन आपल्या घरी आणले. आप्पानी कुळवाड्याच्या शितूला ब्राम्हणाच्या घरचे संस्कार, रीतीभाती शिकवले. अगदी स्तोत्र सुद्धा.
समवयीन असणारे शितू आणि विसू यांच्या मध्ये एक वेगळच नाते निर्माण होते. एक अनामिक प्रेमाचे नाते त्यांच्या मध्ये निर्माण होते. शितूची काळजी घेणे तिचे रक्षण करणे हे विसूचे कर्तव्य बनते. तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट विसू मानत असे.या प्रेमामध्ये  विरहप्रेम सुद्धा आहे. ज्याने प्रेमाची वेगळीच परिभाष समजते. अशा सुंदर कथे मध्ये एक वादळ येतं.विसू आणि शितू यांच्या मध्ये बाहेरून आलेली प्रीती जेव्हा संस्कार आणि समाजाच्या भीती ने दुभंगते तेव्हा वाचकाचे मन पिळवटुन जाते.
कादंबरीमध्ये प्रसंगानुरूप छोटी छोटी रेखाचित्रे आहेत.ही रेखाचित्रे दीनानाथ दलाल यांनी रेखाटली आहेत. त्यामुळे कादंबरी वाचण्यामध्ये अधिक रस निर्माण होतो.वाचक कादंबरीकडे ओढला जातो ते म्हणजे गो.नी.दाण्डेकर यांच्या लेखणीने. खुप सुंदर प्रकारे सभोवतालच्या परिसराचे वर्णन असो व उध्दभवणाऱ्या परिस्थितीचे गांभीर्य यामुळे वाचकाच्या हातामधुन  कादंबरी सोडवत नाही. कादंबरीची भाषा कोकणातील आहे. कादंबरीचे प्रकाशन मृण्मयी प्रकाशनने केले आहे. कादंबरीचे मुखपृष्ठ रविमुकुल यांनी केले आहे. अत्यंत सुंदर असणारी ही कादंबरी प्रत्त्येक वाचकाच्या संग्रही असलीच पाहिजेल. लहानां पासुन मोठ्यांपर्यंत सर्वानी ही वाचलीच पाहिजेल अशी कादंबरी लेखक गो.नी.दाण्डेकर (गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकर) लिखित शितू.

धन्यवाद. 


श्रीजीवन तोंदले

Friday, March 8, 2019

Not Without My Daughter

Not Without My Daughter


Not Without My Daughter

आज काल  खुप बातम्या ऐकायला  येतात  काही लोक आपल्या नजर चुकीने म्हणा नाहीतर कोणाच्या तरी भुल थापेला बळी पडून, तर कधी  देशस्वरक्षणासाठी परक्या देशामध्ये अडकुन पडतात. अशी खुप लोकं दुसऱ्या देशामध्ये अडकली आहेत. आपल्या मायदेशी परत जाण्यासाठी खुप झटत आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंबांमधील लोक आपला माणूस परत आपल्या घरी यावे म्हणुन ते सुद्धा अतोनात प्रयेत्न करत आहेत. कोणाची पत्नी,कोणाची बहीण तर कोणाचे मित्र.
नमस्कार मित्रहो आज जागतिक महिला दिन. या दिवसाचे अवचित साधुन आज मी एक स्त्रीच्या संघर्षाची कथा सांगणारे पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. या विश्वाने आज वर स्त्री चे किती तरी रूप पाहिले. कधी प्रियासी होऊन तिने त्या मुरली मनोहर कृष्णावर वेड्या सारखं प्रेम केलं. कधी पत्नी होऊन यमराजा काढुन आपल्या पतीचे प्राण मागितले. यासोबतच  कधी आई होऊन तिने शिवबाला हिंदवीस्वराज्याची संकल्पना दिली आणि हिंदवीस्वराज साकारले.
देवाने स्त्रीला दिलेले सर्वश्रष्ठ वरदान म्हणजे आई होणे होय. एक आई आपल्या लेकराची स्वतःच्या जीव पेक्षा जास्त काळजी घेते. आपल्या लेकरा शिवाय तिचे दुसरे विश्वच नसते. आपले लेकारु क्षणासाठी तिच्या नजरे पासुन दुर झाले तरी तिचे मन कासावीस होते.तिच्या लेकरावर कोणते संकट आले तर  ती ते स्वतःवर घेते. त्या संकटाशी दोन हात सुद्धा करते. त्याच आई समोर जेव्हा तिचं  लेकरु दूर करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तिची त्या विधात्याशीही लढण्याची तयारी असते. अशाच एका आईच्या संघर्षाची कथा सांगणारे पुस्तक. बेट्टी महमुदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या संकटाची कहाणी सांगणारी कादंबरी नॉट विदाऊट माय डॉटर (Not without My Daughter).
३०६ पानांची ही कादंबरी जेव्हा वाचायला सुरु केले तेव्हा ती हातातुन बाजुला ठेऊ वाटत नाही. क्षणा क्षणाला उत्कंठता वाढणारे कथानक आपल्याला कथेशी धरून ठेवते. यशस्वी होऊन अमेरिकेमध्येच स्थायिक होऊन. स्वतःला अमेरिकन बनवुन घेण्याच्या महत्त्वाकांक्षेने एक तरुण अमेरिकेमध्ये येतो आणि एका तरुणीच्या प्रेमामध्ये पडतो.ती सुद्धा त्या तरुणाच्या प्रेमात पडते आणि दोघे लग्न सुद्धा करतात. तो तरुण म्हणजे मुडी महमूदी आणि तरुणी म्हणजे बेट्टी महमुदी.सुखाचा संसार सुरू होत. त्याच्या संसाराच्या वेलीला एक कळी उमलती.त्यांची मुलगी माहतोब. आपल्या मायदेशी म्हणजेच इराणला आपल्या कुटुंबाची भेट घडवुन आणण्याच्या हेतूने मुडी आपल्या पत्नीला आणि मुलीला म्हणजेच बेट्टी आणि माहतोब यादोघींना घेऊन तो इराणला येतो. इथून कादंबरीची सुरवात होते. अमेरिके सारख्या स्वच्छ देशामध्ये रहाणारी बेट्टी इराणसारख्या गलिच्छ आणि घाणेरड्या देशामध्ये फक्त पंधरा दिवसासाठी म्हणुन जाते आणि तिथे कायमची अडकते. पुढे आपली फसवणुक झाले हे तिला समजते. आपल्या मायदेशी अमेरिकेला परत जाण्याची तिची धडपड सुरु होते. इराण सारख्या पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या देशामध्ये जेथे स्त्रीला पायाची भूल समजले जाते. अशा देशामध्ये ती एका क्रूर आणि जुलमी माणसाच्या हातचं बाहुलं बनून जाते.
आपल्या मायदेशी अमेरिकेला परतण्यासाठी ती अतोनात प्रयत्न करते. त्यामध्ये तिला काही लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतही करतात. तिला अमेरिकेला पळुन जाण्याची संधी मिळते. पण त्यामध्ये आपल्या मुलीला सोडुन एकटीने जावे अशी परिस्थिती निर्माण होते. त्या संधीला ती नाकारते. आणि अमेरिकेला जाईन तर आपल्या मुली सोबतच.असं ती आपल्या मनाशी ठरवते. आपली मुलगी आपल्या पासुन दूर जाऊन नये म्हणून ती दक्ष असते. इराणच्या घातक आणि आई मुलीची ताटातुट करणाऱ्या घाणेरड्या कायद्यांपासुन आपल्या मुलीचे आणि स्वतःचे रक्षण करते. पुस्तकामध्ये उल्लेख केल्या प्रमाणे इराणमध्ये एक कायदा आहे. जर  पतीच्या सहमती शिवाय पत्नीने मुल होऊ नये म्हणुन शास्त्रकिया (copper T Pin) केल्यास,पत्नीला मृत्युव दंडाची शिक्षा आहे. जर आपल्या पतीला हे समजले तर आपल्या मुली पासुन  कायमची दुर होईल म्हणुन बेट्टी महमूदी यांनी ती Copper T  Pin स्वतःकडली. ते वाचतेवेळी अंगावर काटा येतो.  
पुस्तक जसे शेवटाला येते. म्हणजे बेट्टीच्या परतीच्या म्हणजे अमेरिकेला जाण्याचा प्रवास सुरु होते. तेव्हा तर वाचकाला पुस्तक बाजुला ठेऊ वाटत नाही. क्षणा क्षणाला उत्कंठता वाढत जाते.
निडर आणि धाडसी आईच्या संघर्षाची कथा सांगणारे हे पुस्तक प्रत्येक स्त्री ने तर वाचलेच पाहिजेल. पण प्रत्येक पुरुषानी हे वाचलाच पाहिजेल त्याशिवाय एका आईची इच्छा शक्ती किती मोठी असते हे समजत नाही. मुळ इंग्रजी कादंबरीचे मराठी अनुवाद लेखीका लीना सोहनी यांनी सोप्या शब्दांमध्ये केले आहे.कादंबरीचे प्रकाशन मेहता पब्लिशिंगने केले आहे. प्रत्येक मराठी वाचकाच्या संग्रही हे पुस्तक असलेच पाहिजेल. 


श्रीजीवन तोंदले
www.pustakexpress.com