Sunday, October 28, 2018

वाचकाच्या मनाला स्पर्शुन जाणाऱ्या कथा


                                         गंधाली

                                                                      

                                                लेखक - रणजित देसाई

 

 महाराष्ट्रातील थोर,सृजनशील,प्रतिभावंत लेखक स्वामीकर रणजित देसाई लिखित 'गंधाली' हा ऐतिहासिक  कथा संग्रह  घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे.  ऐतिहासिक विषयावरील लेखक रणजित देसाई यांच लिखाण म्हणजे क्या बात. त्यांनी लिहिलेल्या इतिहासा मधील त्या सर्व व्यक्तीरेखा ज्वलंत पणे आपल्या  नजरे समोर उभारतात आणि त्या व्यक्तीरेखे विषयी ओढ निर्माण होते. जणु त्या व्यक्तीना आपण जवळून ओळखतो असाच भास होतो. मग ते स्वामी कादंबरी मधील थोरले माधवराव पेशवे आणि त्यांची पत्नी रामा बाई असो वा पावनखिंड या कादंबरी मधील बाजीप्रभु.

१५८ पानाच्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दोन सुंदर चाफ्याची फुलं आहेत. चाफ्याची फुले हे प्रेमाचं प्रतीक आहे. आजच्या युगातील गुलाबाच्या फुलांनी प्रेम व्यक्त होत असलं तरी त्या काळी चाफ्याच्या फुलांची गंमत काही वेगळीच. आजच्या रोमँटिक होऊ पाहणाऱ्या पिढीला प्रेमाची खरी व्याख्या सांगणारा हा कथा संग्रह आहे. यामध्ये प्रेम आणि वेदना यामधील नातं सांगणाऱ्या कथा आहेत.

बाजीरावांच्या मृत्युने विष पिणारी मस्तानी यांची कथा अंगावर शहरे आणते. बंदेअलींच्या आयुष्याचा सुर असणारी त्यांची पत्नी चुन्ना हे जणू दोघे एकमेकांशी एक रूप असावेत असे त्याचे प्रेम. छत्रपती शिवरायांच्या मृत्यु नंतर सती जाणाऱ्या पुतळा राणी सरकार यांनी त्यांच्या शिवरायांवर असणाऱ्या असीम प्रेमाची गोष्ट सांगितली आहे. पुस्तकांच्या शेवटची कथा ही मेहलका हिची आहे. आपल्या बुद्धीने दरबाराचे  मन झिंकणारी महेलका तिच्या प्रेमाचा गंध यामध्ये सांगते. प्रत्येक कथा मनाला स्पर्शुन जाते. प्रत्येक कथा वाचत असताना त्याच विश्वात, त्याच युगात आपण गेलो आहोत याचा भास होतो.जेव्हा ती कथा संपते तेव्हा त्या प्रेमा विषयी वाचुन मन सुन्न होत.

वाचकाच्या मनाला स्पर्शुन जाणाऱ्या कथा म्हणजे अशी छेडली तार आणि अशी रंगली प्रीत. या दोन कथांनी खर प्रेम काय असत आणि निस्वार्थीपणाने केलेल्या प्रेमाचं मोल काय असत हे समजतं.

पुस्तका मधील भाषा ऐतिहासिक आहे त्यामुळे आपण त्या इतिहासामध्ये रमुन जातो. पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिकेशन यांनी केले आहे. ऐतिहासिक वाचण्याची ज्यांना आवड आहे आणि प्रेमाचा खरा गंध समजून घेणाऱ्यांसाठी तसेच, सर्व वाचकांनी जरूर वाचावे असे हे पुस्तक लेखक रणजित देसाई लिखित 'गंधाली'.

 

      -श्रीजीवन तोंदले

Sunday, October 21, 2018

नितळ,निपक्ष प्रेम करायला शिकवणारी कादंबरी.


                             


                            



महाश्वेता

 

                     लेखिका -सुधा मूर्ती

 

कॉम्पुटर सायन्समध्ये एम.टेक केलेल्या आणि पुण्यातील टेल्को कंपनीमध्ये पहिल्या स्री अभियंता म्हणुन निवडल्या गेलेल्या अत्यंत हुशार आणि मनाने, विचाराने आणि रहाणीमानाने ही अत्यंत साध्या असणाऱ्या, प्रत्येक तरुण-तरुणीच्या प्रेरणा स्थानी असणाऱ्या अशा आदरणीय सुधा मूर्ती यांच्या लिखाणाने समृद्ध झालेली कादंबरी 'महाश्वेता'.

या कादंबरीचा संदर्भ मला त्यांच्या एक पुस्तका मधुन म्हणजेच वाईज अँड अदरवाईज या पुस्तकामधील एका कथेतुन मिळाला. त्या कथे मध्ये महाश्वेता या कादंबरीचा उल्लेख मिळाला. मग मनाशी ठरवलं आणि लगेचच ही कादंबरी वाचायला घेतली.

१५० पानांचे हे पुस्तक इतकी जबरदस्त आहे, की वाचून पूर्ण केल्या शिवाय हातातून खाली ठेवता येत नाही. पुस्तकाचे प्रत्येक पान आपल्याला त्याच्या सोबत बांधून ठेवते. कादंबरीची सुरवात आनंद आणि अनुपमा यांच्या प्रेमाने होते. अनुपमा अत्यंत सुंदर पण एका शाळा मास्तरची मुलगी. दुसरीकडे आनंद अत्यंत हुशार घरंदाज गर्भश्रीमंत डॉक्टर. दोघांचं लग्न होणे अत्यतं कठीण पण सर्वांचा विरोध असुन सुद्धा त्यांचं लग्न होते. पुढे लग्नानंतर काही महिन्यात एक दुर्दैवी घटना घडते. अंगावर कोड उठणे म्हणजे काही मोठा गुन्हा नाही, आणि त्यामुळे समाजने बहिष्कृत करणे ही त्या समाजाची अंत्यंत लाजिरवाणी गोष्ट. अनुपमाच्या सुखी जीवनात ते वादळ येत त्यात ती बिचारी होरपळून जाते. त्यामुळे तिचे सासर आणि माहेरचे नाते तुटून जाते. पण स्वतःला सावरून ती आपल स्वतंत्र विश्व निर्माण करते. पण ते विश्व निर्माण करते वेळी अनुपमाला काही संकटांशी दोन हात करावे लागतात. 

अनुपमा आणि आनंद यांच्या व्यतिरिक्त वसंत, सत्या, डॉली आणि इतर काही व्यक्तिरेखा  या कथेमध्ये येतात.  सुप्रसिद्ध संस्कृत नाटककार व्यास यांच्या नाटकावर आधारित या कादंबरीचा विषय आहे. कादंबरी वाचते वेळी आपण कधी कधी स्वतःला आनंदच्या जागी बघतो  आणि विचार करतो की आपण आनंदच्या जागी असतो तर हेच केले असते का...? तर कधी आपण स्वतःला वसंतच्या जागी बघतो आणि विचार करतो की आपण अनुपमाचा स्वीकार केला असता...?

 कथेच्या शेवटी नाटकातील एक संवाद दिला आहे तो वाचताना आपण स्वतःच अनुपमा आहोत असा भास होतो. स्वतःला असंख्य प्रश्न करणारी आणि त्याची उत्तरे शोधायला लावणारे असे हे पुस्तक लेखिका  सुधा मूर्ती लिखित महाश्वेता.

 कादंबरीचे मराठी अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केले आहे. मेहता पब्लिकेशनने कादंबरीचे प्रकाशन केले आहे. वाचनीय आणि विचार करायला भाग पडणारी कथा. त्यासोबतच नितळ, निपक्ष प्रेम करायला शिकवणारी कादंबरी लेखिका सुधा मूर्ती लिखित महाश्वेता. 

Sunday, October 14, 2018

रहस्यमय आणि गुढ


                                                 
                                               

                                                         दंशकाल

                           

                            लेखक - हृषीकेश  गुप्ते

 

 दंशकाल या कादंबरीकडे ओढलो त्याचं निमित्या म्हणजे रविवार दिनांक २६ ऑगस्ट पत्रकार भवन पुणे येथे झालेल्या या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाला मी गेलो होतो. कादंबरीचं उत्कृष्ट समीक्षण रेखा इनामदार-साने (मॅडम) यांनी केले आणि कादंबरी विषयी ओढ निर्माण झाली. कादंबरी मनामध्ये भरली त्याचे प्रमुख कारण म्हणजे अभिनेते कवी किशोर कदम (सौमित्र) यांनी कादंबरीच्या काही निवडक भागांचे अभिवाचन केले.

 मी काही असा मोठा वाचक नाही, हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लेखक मला माहिती आहेत. खरं सांगायचं झालं तर हृषीकेश गुप्ते हे कोण आहेत हेच मला माहिती नव्हते. मग त्यांच्या विषयी काही माहिती असणं यात शंकाच नाही पण. प्रसन्न जोशी सर (वरिष्ठ निर्माता एबीपी माझा) यांनी या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्य लेखक हृषीकेश गुप्ते यांच्याशी मुक्त संवाद साधला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना हृषीकेश गुप्ते यांनी चांगल्या आणि विचार पूर्वक पद्धतीने उत्तरे दिली आणि यातून मला हृषीकेश गुप्ते समजले.

 आता थोडं या कादंबरी विषयी बोलतो, कादंबरीचं मुखपृष्ठ पाहताच या कादंबरी मध्ये काही तरी गुढ रहस्यमय आणि भयंकर असं काही तरी दडलं आहे असं वाटतं. विहिरीच्या कठड्यावर एक कावळा बसला आहे,विहिरीमध्ये एक दोर खाली जात आहे. दोरखंडाला लामना लटकत आहे. आणि त्या दोरखंडाला पकडून काही माणस वर येण्याचा प्रयत्न करत आहेत, किंवा लटकलेले आहेत. त्या सोबतच विहिरीच्या तळातुन एक भयंकर जीव सापासारख वाटणारा एक भयंकर जीव तो क्रूर हसत आहे, त्याची लाल जीभ बाहेर अली आहे, त्याच्या उघड्या तोंडातले दात खूपच तीक्ष्ण आहेत, त्याचे डोळे खुप भयंकर गूढ ते आपल्या कडेच पाहत आहेत. असं या कादंबरीचे मुखपृष्ठ. जसे हे मुखपृष्ठ आपल्याला तिच्या कडे ओढते तसेच या कादंबरीची कथा सुद्धा.

 कथेची सुरवात होते ती कोकणातुन, कथेचा नायक अनिरुद्ध त्याचा लहान काका त्याच्या भूगावच्या देशमुखांच्या वाड्याच्या दारात वेड लागलेल्या अवस्थेत येऊन उभा रहातो. कथेचा नायक अनिरुद्ध त्याची आई, अण्णा, नंदकाका, भानूकाका, रेवाकाकु, आत्या, यजमान, गार्गी या आणि इतर काही व्येक्तीच्या अवती भोवती ही कथा फिरत असते. कादंबरी जेव्हा वाचायला घेतली तेव्हा कादंबरी हातातून खाली ठेवूस वाटत नव्हती. आता पुढे काय होणार या उत्कंठेने चारशे वीस पानाची कादंबरी कधी संपली हे समजलेच नाही.

 लेखक हृषीकेश गुप्ते यांचे रंगाविषयी वेगळच नातं आहे असं वाटतं. प्रत्येक गोष्टीचं वर्णन करताना त्याच्या रंगासहित ते एक वेगळाच वर्णन करतात. मग ते सकाळच कोवळ ऊन असो वा रात्रीचा गडद अंधार, अगदी लेखकानं केलेलं वरण भाताचं रंगासहित उदाहरण, पिवळ वरण ,पांढरा भात याचा कालवल्या  नंतरचा होणार रंग याच केलेलं वर्णन काही वेगळच वाटत. त्या सोबत मांसाहाराचे केलेल वर्णन तोंडाला पाणी आणते. नायकाच्या वाड्यामध्ये ती एक अनामिक शक्ती अवतरते. तेव्हा त्या शक्तीच केलेल वर्णन, अगदी ती शक्ती अवतरते तेव्हा कापलेल्या बकऱ्याच्या मासाच्या वासाचे केलेले वर्णन. खरोखरच त्या मांसाचा वास नाकामध्ये येतो. त्या अनामिक शक्तीच वर्णन वाचताना मनामध्ये भीती निर्माण होते. वेड लागलेल्या भानू काकाला पुढे दत्ताचा अवतार मानून त्याच्या नावाचा मठ बांधून एक वेगळीच अंधश्रद्धा भूगावत सुरु होते आणि हीच अंधश्रद्धा पुढे देशमुखांचा काळ बनते. कादंबरीमध्ये वर्णन केल्या प्रमाणे नायकाच्या आईविषयी वाचताना मनात एक आई निर्माण होते. नायकच आई विषयी असलेलं प्रेम  कादंबरीत थोडं जास्त घेतलं आहे. विहिरीत पडलेल्या आईला बाहेर काढण्यासाठी नायक जेव्हा विहिरीत उडी मारतो तेव्हा केलेलं वर्णन डोळ्यासमोर येते. वेड लागलेला भानूकाका जेव्हा गावात येतो, तेव्हा त्याच्या सोबत त्याची तरुण पत्नी रेवा काकू पण येते. रेवा काकूंच्या सौदर्याविषयीच केलेल वर्णन मनाला भुरळ घालते.  समलैंगी असलेला नंदा काका त्याच्या ताकतीच वर्णन लेखकांनी खूप छान प्रकारे केलं आहे. फक्त गळा आवळून एखाद्याला मारणारा हा शक्तिशाली माणूस समलैंगिक आहे हे वाचताना आश्चर्य वाटत. नायकाची आजी, आत्या, आत्याचे यजमान आणि गावातल्या काही लोक मिळून भानूकाकाच्या वेडाच्या अंधश्रदेचा बाजार मांडतात. आणि याच बाजारीकरणामुळे देशमुखांची वाहताहत होते. आणि कादंबरीचा दुसरा भाग इथे संपतो.

 कादंबरी मध्ये वर्णन केलेल्या पत्त्यांच्या बंगल्या विषयी वाचताना. आपण स्वतःच मनात एक पत्ताच बंगला बांधतो. कादंबरीमध्ये लेखकाने लहान लहान गोष्टींचे केलेलं वर्णन मनाला मोहून नेत. मग ते उलट्या पंखाची कोंबडी सुपडी असो वा रोहा-दीवा लोकल प्रवास आणि त्याच्या पार्शवभूमी विषयी केलेलं वर्णन. मग नंतर नंतर याच छोट्या छोट्या गोष्टींचे वर्णन नको वाटतातउदा. नायकाने मलेशियाच्या मार्केट मधुन आणलेला सुरा.

कादंबरीचे प्रकाशन राजहंस प्रकाशन यांनी केले आहे. रहस्यमय आणि गुढ वाचण्याची ज्यांना आवड आहे अशा आणि इतर वाचकांनी जरूर वाचावी अशी हि कादंबरी लेखक हृषीकेश गुप्ते लिखेत दंशकाल.  

                                                   

-       श्रीजीवन तोंदले